पापच आपल्या स्वहिताच्या आडवे येते
अभंग १४९२
संचितावांचून ।
पंथ न चलवे कारण ॥१॥
कोरडी ते अवघी आटी ।
वांयां जाय लाळ घोंटीं ॥ध्रु.॥
धन वित्त जोडे ।
देव ऐसें तों न घडे ॥२॥
तुका म्हणे आड ।
स्वहितासी बहु नाड ॥३॥
भावार्थ
पूर्वपुण्य असल्याशिवाय मनुष्य परमार्थाकडे वळत नाही कारण पूर्वपुण्य चांगले असेल तरच मनुष्यला परमार्थाची आवड लागते. वरवर हरीची भक्ती केल्याने काहीच उपयोग होत नाही हरीची कृपा होण्याकरिता लाळ घोटावी लागते. धन द्रव्याच्या जोरावर देव जोडला जातो असे केंव्हाही होत नाही. तुकाराम महाराज म्हणतात आपण केलेले पापच आपल्या स्वहिताच्या आडवे येते
॥ जय जय राम कृष्ण हरि ॥
